एम.पी.एस.सी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गैरप्रकारहोऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.
करिअरच्या मध्यावर म्हणजे पदवीच्या अभ्यासक्रमाची दोन वर्षे पूर्ण करत असताना अनेकांना आपण चुकीचा अभ्यासक्रम निवडला आहे असे वाटू लागते. `त्या' ऐवजी आपण `दुसरा' अभ्यासक्रम निवडायला हवा होता असा साक्षात्कार होतो. असं वाटण्याची कारणे कोणती?
आगामी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षेची तयारी करताना उजळणीला फार महत्त्व आहे. अनेक पुस्तके वाचण्यापेक्षा निवडक संदर्भग्रंथांचा सखोल अभ्यास करा. सर्वसाधारणपणे 50 मिनिटांच्या अभ्यासानंतर पाच मिनिटांचा ब्रेक घ्या. पुढचा घटक अभ्यासण्याआधी मागच्या घटकातील किती गोष्टी लक्षात राहिल्या याचे मनन करा. दिवसाअखेरीस आपण किती वाचले आणि त्यापैकी आपल्या किती लक्षात राहिले हे तपासून पाहा. प्रत्येक आठवडयाच्या शेवटी आणि प्रत्येक महिन्याअखेरीस आपण अभ्यासलेल्या प्रत्येक घटकाची उजळणी करा. परीक्षा जवळ आली असल्याने रोज किमान 50 ते 100 बहुपर्यायी शब्द सोडवण्याचा सराव करा. या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न सोडविण्याची पद्धत उपयुक्त आहे.
सर्वसाधारणपणे प्रशासकीय सेवेतील मुलाखती अधिक औपचारिक असतात. यामध्ये प्रोटोकॉल ची जाण, वरिष्ठ पदांचे भान या बाबी अपेक्षित असतात. पीएसआय चे पद हे एकात्मिक सेवा आणि कायदासुव्यवस्थेशी थेट निगडित असल्याने उमेदवारांकडून शिस्तीची अपेक्षा अधिक असते. त्यामुळे उमेदवारांचे सादरीकरण व देहबोली सकारात्मक असायला हवी.
5 नोव्हेंबर 2014 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विक्रीकर विभागातील विक्रीकर निरीक्षक `गट ब' या संवर्गातील एकूण 445 पदांच्या भरतीकरता अधिसूचना जारी केली. ही परीक्षा 1 फेब्रुवारी 2015 रोजी राज्याच्या 36 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमात सामान्य अध्ययन या घटकाअंतर्गत `भारतीय अर्थव्यवस्था' हा महत्त्वाचा घटक समाविष्ट करण्यात आला आहे.
यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्राचा अभ्यास करताना सुरुवातीला मुख्य आर्थिक संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. अलीकडच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर लक्षात येते की, अर्थशास्त्रावर बेतलेले प्रश्न हे संकल्पनांवर आधारित असतात. काही आकडेवारी लक्षात ठेवावी लागते अथवा ती पाठ केल्याशिवाय पर्याय नसतो, उदा. जनगणनेसंबंधित आकडेवारी, आयातनिर्यातसंबंधित आकडेवारी. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. खूप काळ एकांतवासात राहायला लागले, तर आपला मानसिक तोल ढासळू लागतो, हे अनेक शोधांद्वारे सिद्ध झालेले आहे. असे असतानाही अनेकांना इतरांशी संवाद साधणे कठीण जाते.
शिक्षण पद्धतींमध्ये झालेल्या बदलांप्रमाणे डिस्टन्सएज्युकेशन म्हणजेच दूरस्थ शिक्षण हा एक नवीन मार्ग म्हणता येईल. शिक्षण घेऊ इच्छिणाNयांसाठी एक नवीन पर्याय आहे असेही म्हणता येईल. या डिस्टन्स एज्युकेशनमुळे जॉब करून शिकू पाहणा-या किंवा एका शाखेतून दुस-या शाखेत शिकू इच्छिणा-यांसाठी ज्ञानाचे एक नवीन कवाड खुले झाले आहे किंवा शिक्षण अर्धवट झालेल्यांसाठी देखील हि सुवर्णसंधी आहे.
मुख्य परीक्षेत निबंध अनिवार्य असतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तो विषयाला अनुसरून, मुद्देसूद, विविध चर्चाचा ऊहापोह केलेला असावा. मुख्य म्हणजे त्यात स्वत:ला अधोरेखित करावं. वर्तमानाचं भान ठेवून सुवाच्च अक्षरात निबंध लिहिला तर नक्कीच चांगले गुण मिळतील. मात्र त्यासाठी कसा सराव करणं आवश्यक आहे, याबाबतची थोडक्यात माहिती राज्यसेवा मुख्य परीक्षेत 800 गुणांपैकी 200 गुण - वर्णनात्मक मराठी आणि 100 गुण इंग्रजी असं स्वरूप आहे. या वर्णनात्मक स्वरूपाच्या उत्तरांना नकारात्मक गुणपद्धती नाही. त्यामुळे गुण मिळवण्यासाठी मराठी एक चांगला विषय आहे. परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये मराठी विषयाचा पहिला पेपर असतो. तोच जर चांगला लिहिला गेला तर `चांगली सुरुवात अर्धे अधिक काम जिंकून देते' याचा प्रत्यय येतोच.
नवीन नोकरीत न चुकणारी एक गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू. रंजनच्या मते, त्याला एखाद्याच्या समोर बसून उत्तरे कशी द्यायची हेच जमत नाही आणि आपण दिलेलं उत्तर बरोबर आहे का? योग्य शब्द वापरले आहेत का? आपल्याकडून नक्की काय अपेक्षित आहे, याचा अंदाजच येत नाही. अर्थात, रंजन असा एकटाच नाही. त्याच्यासारखे प्रश्न असलेले आणि दोलायमान मनस्थिती असलेले अनेक असतात. तसं पाहायला गेलं, तर बहुतांश इंटरव्ह्यूमध्ये ठराविक प्रकारचेच प्रश्न विचारले जातात. आपल्याला हे माहीत असूनही उत्तरांची तयारी केली जात नाही.
परीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम पुस्तकाचे परिणामकारक वाचन होणे आवश्यक आहे. एक गुणाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करताना प्रत्येक पाठातील महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करायला हवी. उदाहरणार्थ, `के 2' हे भारतातील सर्वांत उंच शिखर आहे. किबिथू हे भारताचे पूर्वेकडील परमस्थान आहे. बिकानेर ही आशिया खंडातील सर्वांत मोठी लोकर बाजारपेठ आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न केवळ स्वाध्यायांपुरते मर्यादित नाहीत, तर पाठ्यपुस्तकातील कोणत्याही भागातून विचारले जाऊ शकतात. प्रत्येक पाठात चौकटीत जी माहिती दिलेली आहे, त्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|